अजीम नवाज राही
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००५
जगात अब्जावधी प्रकारचे जीव आहेत. या जीवांत माणूसच कविता करतो; कारण त्याचा मेंदू पूर्णपणे विकसित झालेला आहे. म्हणूनच तो अतिशय संवेदनशील आहे. त्याच्या मेंदूवर त्याच्या सभोवतालचे प्रतिसाद उमटतात आणि ते त्याला मिळालेल्या भाषेतून व्यक्त होत जातात.तो आपले मन कवितेच्या तरल माध्यमातून मोकळे करीत जातो.
