आनंदवनसंस्था
समाजकार्य जीवन गौरव पुरस्कार २०१८
बाबा आमटे यांनी १९४९ मध्ये विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात ओसाड व सर्व प्रकारचे दुर्भिक्ष असलेल्या प्रदेशात , आदिवासींच्या सहवासात आनंदवन या संस्थेची स्थापना केली.त्या घटनेला २०१९ मध्ये ७० वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रदीर्घ वाटचालीत आनंदवन संस्थेने किती प्रकारचे कल्याणकारी काम केले आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु ते कार्य वरवर दिसणारा एक छोटा भाग आहे. अधिक महत्वाचे आहे .ते म्हणजे ही संस्था महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातीलतरुणाईला, कार्यकर्त्यांना ऊर्जाश्रोत म्हणून उपयुक्त ठरली. बाबा आमटे हयात होते त्या साठ वर्षात तर ते स्थान आनंदवनला होतेच , पण ते गेल्यानंतरही ते आकर्षण कायम राहिले आहे.










