डॉ. मोहन देशपांडे
महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार– २००४
सत्तरीच्या अस्वस्थ दशकाने महाराष्ट्राला अनेक संवेदनाशील, बंडखोर आरोग्यविषयक जाणिवांचा कार्यकर्ते दिले. अस्वस्थ दशकातील कार्यकर्त्यांच्या या मोठ्या फळीने प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान दिले. समाजकारणाला, राजकारणाला नवी परिमाणे दिली. नवे संदर्भ दिले. तोवरच्या प्रस्थापित मूल्यांना व्यवहारांना आव्हान दिले. मागोवा, युक्रांद, लिटल मॅगेझीन मुव्हमेंट, दलित पँथरची चळवळ, स्त्री-मुक्ती चळवळ आणि नंतरच्या काळात छात्र युवा संघर्षवाहिनी असे अनेक वैचारिक प्रवाह याच काळात महाराष्ट्रात उभे राहिले, विकसित झाले.
